लघुपाटबंधारे विभाग
परिचय
जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, ठाणे.
व्हिजन आणि मिशन
लघुपाटबंधारे विभाग हा ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 14विभागांपैकी एक विभाग आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी हे विभागाचे प्रमुख असतात.
जिल्हा जलसंधारण विभागामार्फत 0 ते 100 हेक्टर्स सिंचन क्षमतेच्या ल. पा. योजना, पाझर तलाव, को.प.बंधारे, सिमेंट नाला बंधारे,गावतलाव बांधण्यात येतात. बिगर आदिवासी क्षेत्राचे जिल्हा नियोजन विभागामार्फत व आदिवासी क्षेत्राचे नियोजन आदिवासी प्रकल्प विभागा मार्फत करुन कामे प्रस्तावीत करण्यात येतात.
उद्दिष्टे कार्ये मजकूर
गाव तलाव बांधणे, दुरूस्ती करणे व सुशोभिकरण करणे
गावाच्या जवळ नाल्यावर सर्वसाधारणपणे 3.00 मी खोदकाम करून 3.00 मी. उंचीचा मातीचा बांध बांधुन निर्माण केलेला जलसाठा म्हणजे गावतलाव. याचा उपयोग पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे हा आहे.
२.सिमेंटकॉक्रिटबंधारेबांधणे/ दुरूस्तीकरणे
लहाननदी/नाल्यावर संधनाकातील बांधकामाव्दारे बांधाचे बांधकाम करून मान्सुनोत्तर पाणी आडवुन केलेला जल साठा म्हणजे बंधा-याचा उपयोग पाझरातुन विहीरींचे पुनर्भरणहोणे, शेतीचे सिंचनासाठी व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे हा आहे.
योजनेचे निकष –
1) पायासाठी उत्तम प्रकाराचा कठीण खडक कमी खोलीवर उपलब्ध असणे आवश्यक
2) नाल्याचे दोन्ही तिर पुरेशे उंच असावेत.
3) संधानकासाठी उतम दर्जाची खडी व वाळु उपलब्ध असणे आवश्यक आहे.
4) संधानकासाठी मिक्सर व व्हायबरेटरचा वापर करणे आवश्यक आहे.
5) जमिनीवरील बंधा-याच्या उंची पेक्षा पायाची खोली जास्त नसावी.
6) शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या आर्थिक मापदंडात योजना बसणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरुप – पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे, शेतीचे सिंचनासाठी व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे. अप्रत्यक्षपणे सिंचन क्षमतेत वाढ होणे.
३.उपसासिंचनयोजना
आदिवासी भाग सर्वसाधरण पणे डोंगराळ स्वरुपाचा व धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात येत असल्याने आदिवासी शेतकयांना धरणातील पाण्याच्या सिंचनाचा लाभ मिळणेसाठी शासनाकडुन 100% खर्चाने उपसा सिंचन योजना राबविण्यात येतात.
योजनेचे निकष –
1) योग्य जागा व मागणी आवश्यक आहे.
2) लाभक्षेत्र किमान 25 हेक्टर असावे.
3) एकुण आदिवासी लाभार्थी किमान 90% असावेत.
4) लाभार्थ्यानी सहकारी संस्था स्थापन करुनती पंजीबध्द करणे आवश्यक आहे.
5) पाणी परवानगी आवश्यक आहे.
6) शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या आर्थिक मापदंडात योजना बसणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरुप – आदिवासी शेतक-यांना धरणातील पाण्याच्या सिंचनाचा लाभ मिळणे.
प्रशासकिय सेटअप-
- जिल्हाजलसंधारणअधिकारी, लघुपाटबंधारेविभाग, जिल्हा परिषद, ठाणे.
- उपविभागीयजलसंधारणअधिकारी, जि. प. ल. पा. उपविभाग, मुरबाड
- उपविभागीयजलसंधारणअधिकारी, जि. प. ल. पा. उपविभाग, भिवंडी
योजना
- राज्य सरोवर संवर्धन योजना.
गांव तलाव, सरोवर आणि जलाशयांचे पर्यावरणाच्या संतुलनातील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजना सन २००१ पासून प्रथमतः प्रायोगिक तत्त्वावर व नंतर नियमितरीत्या सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यातील तलावांचाही समावेश करण्यात आला आहे. तथापि, राज्यातील एकूण तलावांची संख्या विचारात घेता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेत त्या सर्व तलावांचा समावेश नजीकच्या कालावधीत होणे शक्य नसल्याने राज्य स्तरावर सन २००६-०७ पासून सरोवर संवर्धन योजनेची सुरुवात करण्यात आली
सक्रिय सहभागाची तयारी जसे-
१. तलावाच्या पाण्याच्या शुध्दीकरणासाठी प्रक्रिया वा उपाययोजना.
२. तलावाच्या काठाचे / बांधाचे मजबुतीकरण जसे कॉक्रिटीकरण वगळून Stone Pitching.
३. तलाव क्षेत्रास कुंपण वा संरक्षण उपाययोजना-संमिश्र (Chain Link Fencing सह)
४. लाभक्षेत्रातील लोकसंख्येस आवश्यकतेनुसार सार्वजनिक सुविधा पुरविणे जसे शौचालय किंवा फिरते शौचालय, कचरापेटी.
५. तलाव नजीकच्या क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापन.
६. सुशोभीकरण-जसे तलाव लगतच्या क्षेत्रात वनीकरण, वृक्षलागवड, सौर पथदिवे, पेंडल बोटींग.
७. जनजागृती.
८. प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक तज्ञांची उपलब्धता.
९. सांडपाणी पुनर्वापरास प्रोत्साहन,
- गाळ्मुक्त धरण व गाळयुक्त शिवार.
या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे जीओटॅगिंग, योजनेची प्रणालीवर माहिती संकलित करणे इत्यादी स्वरुपाची प्रक्रिया अवनी app अन्वये करण्यात येईल. अंचनी app अंतर्गत खालील बाबींचा समावेश आहे:-
- जलस्तोत्र निहाय साचलेल्या गाळाची माहिती.
- प्रत्येक साईटची कामेसुरू करण्यापूर्वीची, चालू असताना आणि कामे पूर्ण झालेनंतरची चित्रे आणि व्हिडिओ.
- शेतकरी व त्यांनी नेलेल्या गाळाची माहिती.
- जलसाठे व गाव निहाय शेतकरी निहाय भूधारणा, घेऊन गेलेल्या गाळाचे प्रमाण व भरलेल्या ट्रॉलीची (ट्रॅक्टर ट्रॉलीच्या तपशीलासह) संख्या याची माहिती
- उत्खनन यंत्रसामुग्रीच्या कामाच्या तासांची संख्या,
- एकूण काढलेल्या गाळाचे परिमाण
- त्यातील ताळमेळ समजून घेण्यासाठी दैनंदिन डेटा एंट्री आणि B रेकॉर्डिंग ची तपासणी केली जाईल.
- सर्व कामे कुठे वेगाने सुरू आहेत आणि कोणते जिल्हे मागे आहेत याची जिल्हास्तरीय माहिती.
- जलयुक्त शिवार अभियान.
सन २०१२-१३ मध्ये टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पुणे विभागातील ५जिल्हयांत जलयुक्त गांव अभियान हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये सर्व विभागाच्या समन्वयातून एकत्रितपणे वेगवेगळ्या योजना राबवून पाणी अडविण्यासाठी व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात आला. या अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध / के.टी. वेअर दुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्तोत्र बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओडे/नाले जोड कामे हाती घेण्यात आली.
अभियानाचा उद्देश :
१) पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे शिवारातच अडविणे,
२) भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.
३) राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे शेती साठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे
४) राज्यातील सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता ग्रामीण भागातील
बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनर्जिवीकरण करुन पाणी पुरवठ्यात वाढ करणे.
५) भूजल अधिनियम अंमलबजावणी. ६) विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे.
७) पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नविन कामे हाती घेणे.
८) अस्तित्वात असलेले व निकामी झालेल्या जलस्तोत्रांची (बंधारे/गाव तलाव/पाझर तलाव / सिमेंट बंधारे) पाणी साठवणक्षमता पुर्नस्थापित करणे/वाढविणे,
९) अस्तित्वातील जलस्रोतांमधील गाळ लोक सहभागातून काढून जलस्रोतांचा पाणी साठा वाढविणे.
१०) वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देऊन वृक्ष लागवड करणे, ११) पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव जागृती निर्माण करणे.
१२) शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणेस प्रोत्साहन/जनजागृती करणे.
१३) पाणी अडविणे/जिरविणे बाबत लोकांना प्रोत्साहित करणे / लोकसहभाग वाढविणे
१.संलग्न कार्यालये-प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे
२संचालनालय / आयुक्तालय- आयुक्त, मृद व जलसंधाण विभाग, संभाजीनगर.
राज्य सरकार
गावतलाव बांधणे,दुरूस्ती करणे वसु शोभिकरण करणे
सिमेंट कॉक्रिट बंधारे बांधणे/ दुरूस्ती करणे
उपसासिंचन योजना
राज्य सरोवर संवर्धन योजना.
गाळ्मुक्त धरण व गाळयुक्त शिवार.
जलयुक्त शिवार अभियान
योजना—
योजनेचे उद्दीष्ट–
- आदिवासीशेतक-यांना धरणातील पाण्याच्या सिंचनाचा लाभ मिळणे.
- पाझरातुनविहीरींचे पुनर्भरण होणे व पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे. अप्रत्यक्षपणे
सिंचन क्षमतेत वाढ होणे.
- पाझरातुनविहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे हा आहे.
- तलावाच्या पाण्याच्या शुध्दीकरणासाठी प्रक्रिया वा उपाययोजना,तलाव क्षेत्रास कुंपण वा संरक्षण उपाययोजना-संमिश्र (Chain Link Fencing सह),सुशोभीकरण-जसे तलाव लगतच्या क्षेत्रात वनीकरण, वृक्षलागवड, सौर पथदिवे, पेंडल बोटींग.
- जलसाठे व गाव निहाय शेतकरी निहाय भूधारणा, घेऊन गेलेल्या गाळाचे प्रमाण व भरलेल्या ट्रॉलीची (ट्रॅक्टर ट्रॉलीच्या तपशीलासह) संख्या याची माहिती,उत्खनन यंत्रसामुग्रीच्या कामाच्या तासांची संख्या,एकूण काढलेल्या गाळाचे प्रमाण.
- जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध / के.टी. वेअर दुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्तोत्र बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओडे/नाले जोड कामे हाती घेण्यात आली.
विभाग प्रमुख
नाव – श्री. दिलीप मुरलीधर जोकार
पदनाम- जिल्हा जलसंधारण अधिकारी
ईमेल पत्ता – mizpthane@gmail.com
पत्ता -कार्यालयाचा पत्ता- स्केअर फिट होम्स, प्लॉट क्र 106,107 एस.जी.बर्वे रोड, रोड नं.22 टोयाटो शोरूम च्याबाजूलावागळे इस्टेट, एम.आय.डी.सी. ठाणे (प)
किशोर सिंचन तलाव ता. मुरबाड
कोसले पाझर तलाव ता.कल्याण Paye CNB Bandhara, Taluka – Bhiwandi
Repairs of Mohili Village Tank, Tal- Bhiwandi KT Bandhara At Tembhare , Tal :-Shahapur